‘एक वेळ पुस्तकं निराश करतात; पण माणसं आपल्याला कधीही निराश करत नाहीत. त्यांना निरखणं, त्यांची बोलणी कान देऊन ऐकणं, त्यांच्या वागण्याचा अन्वयार्थ लावणं, वरवरच्या विसंगतीत दडलेली सुसंगती समजून घेणं हे नेहमीच फार अर्थपूर्ण वाटतं,’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी त्यांच्या या कथासंग्रहामागची भूमिका व्यक्त करताना लिहिलेले हे मनोगत.
या मनोगतातूनच त्यांच्या या एकूण ११ कथा माणसांवर, माणसांच्या वागण्यावर, नात्यांवर आधारित आहेत. मध्यमवर्गीय घरांमध्ये घडणाऱ्या प्रसंगांमधून या कथा उलगडत जातात. ‘पडदा’ या कथेची सुरुवात राणी आणि प्रसन्नजीतच्या विवाहाच्या बातमीपासून होते. ही बातमी समजल्यापासून विवाह होईपर्यंत घडणारे नाट्यसंवाद, प्रसंगांमधून समोर उभे राहते. त्याचबरोबर नात्यांची गुंफण समोर येते. तशीच नात्यांची खोली दाखविणारी संजीवनी, धुरंधरची ‘शब्द’ ही कथा.
प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : १६०
किंमत : १८० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)